सर्व शाळांमधे क्वारंटाईन सेंटर करा - जावेद नायकवडी
सध्या सर्वत्र कोरोनाचे प्रस्थ वाढत आहे. अनेक रुग्ण बेड न मिळालेने होम क्वारंटाईन होत आहेत. परंतु, अनेक रुग्णांना होम क्वारंटाईन होताना घरातील असुविधांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी शासनाने सध्या बंद असलेल्या शाळांमधे सोय करुन केअर सेंटर तयार करावे, अशी मागणी भीम आर्मी पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी केली आहे.
भीम आर्मी (पश्चिम महाराष्ट्र) ची मागणी
कराड/प्रतिनिधी :
सध्या सर्वत्र कोरोनाचे प्रस्थ वाढत आहे. अनेक रुग्ण बेड न मिळालेने होम क्वारंटाईन होत आहेत. परंतु, अनेक रुग्णांना होम क्वारंटाईन होताना घरातील असुविधांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी शासनाने सध्या बंद असलेल्या शाळांमधे सोय करुन केअर सेंटर तयार करावे, अशी मागणी भीम आर्मी पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी केली आहे.
सातारा येथे नुकत्याच झालेल्या भीम आर्मीच्या बैठकीत भीम आर्मी पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांच्यासह सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे व अन्य पदाधिकारी यांनी केली आहे.